expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: internate
Showing posts with label internate. Show all posts
Showing posts with label internate. Show all posts

Friday, July 17, 2020

Marathi Essay on Gurupournima



गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्र्म्हा गुरुर्विष्णू: गुरु दैवो महेश्वरा : |

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: |

        

         गुरु म्हणजेच ब्रम्ह, गुरु म्हणजेच विष्णू, गुरु म्हणजेच शिव व गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म अशा या ईश्वररूपी गुरूंना माझा नमस्कार असो. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. मराठी महिन्यातील आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी   केली जाते.

गुरु म्हणजे कोण

Who is Guru?

          गुरु म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे ते गुरु. आपले जीवन घडवणारे, आपल्यावर योग्य संस्कार करणारेआपल्याला योग्य मार्ग दाखवणारे. आपल्यामध्ये शक्तीचा संचार करून कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत देणारे गुरुच असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजेच आपले मातापिता होत. आपले संगोपन करतात. आपल्याला बोलायला, चालायला शिकवतात. हाताला धरून उठवतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी चांगल्या शाळेत घालतात. अशा प्रकारे आपले आईवडील आपली काळजी घेतात. त्यामुळे आपले आईवडील आपले प्रथम गुरु होत. आपल्याला शिकवणारे शिक्षक हे सुद्धा आपले गुरुच होत. आपण त्यांच्या सान्निध्यात दिवसातील काही तासच असतो. परंतु शालेय शिक्षणाबरोबर ते आपल्याला इतरही ज्ञान देतात. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना फुलांचा गुच्छ, भेटवस्तू, मिठाई इ. वस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.

गुरूचा इतिहास : 

History of Guru

        गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही

 म्हणतात. व्यासऋषींनी वेदांचे ज्ञान सर्व

 जगाला दिले. त्याच प्रमाणे त्यांनी

महाभारत हा पवित्र ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी जीवनाचे रहस्य सर्वांना समजावले. म्हणूनच ते आद्यगुरू होत. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम व्यास ऋषींचे पूजन केले जाते.

मानवी जीवनात गुरुची आवश्यकता :

(Need of Guru in human life)

          प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी चिंता भेडसावत असते. जीवनात ज्यावेळी सुख येते त्यावेळी माणूस आनंदी होतो. आपल्या सुखात हुरळून जातो. पण एखादे वेळेस वाईट प्रसंग आला तर मात्र तो मनाने खचून जातो. आपल्यावर हा प्रसंग का आला? या प्रश्नाचे उत्तर शोधू लागतो. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. काही जणांच्या मनात अशा वेळी वाईट विचार येऊ लागतात तर काही माणसे व्यसनाधीन होतात. परंतु अशा बिकट प्रसंगी जर एखादा योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक मिळाला तर माणसाला कुठच्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मिळते व तो सुख किंवा दु:ख या दोन्ही प्रसंगी मनाचा समतोल राखू शकतो. म्हणूनच धावपळीच्या या मानवी जीवनाला गुरूंची आवश्यकता आहे.

खरा गुरु कोण

Who is the Real Guru?


          खरा गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याला प्रपंच सांभाळून त्याची उन्नती व अद्यात्मिक प्रगती कशी होईल? यासाठी त्याला योग्य ती साधना देतात. त्याचप्रमाणे शिष्य सुद्धा आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे आचरण करतो व नम्रपणे वागतो. तोच शिष्य गुरुचाआशिर्वाद संपादन करतो. अशा प्रकारे गुरु आपल्या शिष्याला ईश्वरी रूपात  वेळोवेळी मदत करतात. जो गुरु निस्वार्थी, निरपेक्ष राहून शिष्यांना मदत करतो तोच खरा गुरु होय.

          आजकाल समाजामध्ये गल्लोगल्ली बरेच बुवा, गुरु सापडतात. एखाद्या संकटात असलेल्या माणसाला एखादा उपाय सांगून काहीतरी विधी करण्यासाठी पैसे मागतात. अशा प्रकारे भरकटलेला माणूस आपले काम होईल या इच्छेने आपला वेळ व पैसा वाया घालवतात. त्यामुळे आपण ज्यांना गुरु मानतो त्याची योग्यता पडताळून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, सावधान! कुणालाही गुरु मानून कुठल्याही बुवांच्या नादी लागू नका, सत्कर्म करा. या विश्वात एक अद्भुत शक्ती आहे तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती शक्ती आपल्याला योग्य गुरुच्या सहवासात प्राप्त होते. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा आपल्या इष्ट गुरूचे पूजन करून त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करा व इतरांना सहाय्य करा.        
                             
               गुरुपौर्णिमा


English Translation


Gurupournima

Gururbrahma Gururvishnu: Guru Daivo Maheshwara: |

Guru: Sakshatparbrahm Tasmai Srigurve Nama: |
     
 Guru is Brahma, Guru is Vishnu, Guru is Shiva and Guru is Parabrahma. Gurupournima is a day to express gratitude to your Guru. Gurupournima is celebrated on the full moon day of the Marathi month of Ashadh.

Who is Guru?

     Guru(Teacher) is the guide. He is the Guru who shows us the path of knowledge from the darkness of ignorance. The ones who shape our lives, the ones who nurture us, the ones who show us the right path. We have gurus who dare to face any situation by transmitting power to us. The first Guru in the life of each of us was our parents. They take care of you. They teach you to walk. They hold our hands and to get up if we fell down. They send their children to good schools so that they can get a good education. This is how your parents take care of you. So our parents became our first gurus. The teacher who taught us was also our guru. We spend only a few hours a day with them. But along with school studies, they give us other knowledge too. So Gurupournima is celebrated in every school. On this day, students are given bouquets of flowers, gifts, sweets, etc to their teacher. They are honored by giving things.

History of Guru:

   Gurupournima is also called Vyaspoornima. Vyasarishi gave the knowledge of Vedas to all the world. In the same way, he wrote the holy book 'Mahabharat'. Through this book, he explained the secret of life to everyone. That is why he became Adyaguru.(the first Guru) That is why the first Vyas sage is worshiped on the day of Gurupournima.

Need of Guru in human life:

        Every human being has some kind of anxiety. Man is happy when there is happiness in life. He is overwhelmed by his happiness. But when bad things happen to him, he gets depressed. Why did this happen to you? The answer to this question begins to be found. He can't find the answer to his question. Some people have bad thoughts at such times, while others become addicted. But in such a difficult situation, if a guide is found to show the right path, a person gets the courage to face any situation and he can balance the mind in both happiness and sorrow. That is why this fast-paced human life needs a Guru.

Who is the Real Guru?
     
 The real Guru is the one who takes care of his disciple's world and how will he progress and progress? They give him the right tools for this. In the same way, the disciple also obeys his master and behaves humbly. The same disciple acquires the Guru's blessing. Thus the Guru helps his disciple from time to time in the divine form. The true Guru is the one who helps the disciples selflessly and impartially.

        In today's society, there are many Gurus in so many places. They ask for money to perform a ritual by telling a man in trouble a solution. Thus the wanderer wastes his time and money in the hope that his work will be done. Therefore, it is very important to verify the merits of those whom we consider being gurus. So friends, beware! Do not follow the advice of any person as a guru, do good deeds. Try to know that there is a wonderful power in this universe. That power we get in the company of the right Guru. In this way, celebrate Gurupournima by worshipping your respected Guru and follow his teachings and help others.

Saturday, July 4, 2020

Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



 Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



दिलेल्या शीर्षकवरुन गोष्ट लिहा.

असेल जिथे इच्छा असेल तिथे मार्ग

A story on ‘Where there

 is a will there is a way’

        आकूर नावाचे एक गाव होते. त्या गावात राहुल नावाचा एक मुलगा त्याच्या आईसोबत राहत असे. त्याची आई शेतात मोल मजुरी करत असे. राहुलही कधी कधी आईला तिच्या कामात मदत करत असे. राहुल सातवी इयत्तेत शिकत होता. अभ्यासात तो हुशार होता. एकदा त्याला कळले की शेजारच्या गावात तीन दिवसकरिता पुस्तक प्रदर्शन भरले आहे. राहुलला त्या प्रदर्शनात जाण्याची फार इच्छा होती. त्याचे काही मित्र प्रदर्शनात जाऊन आले. त्यांनी संगितले की प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावरची खूप छान पुस्तके आहेत. तसेच पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. राहुलला ते ऐकून फार आनंद झाला. त्याने आईला, प्रदर्शनात जाऊ का? असे विचारले. आईने नकार दिला. ती म्हणाली,”आपल्याकडे तुझ्या सोबत जायला कुणी मोठ माणूस नाही तसेच पुस्तक विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसेही नाहीत.”

        राहुल खिन्न झाला तो चालत चालत घरापासून दूर अंतरावर असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. त्याला वाईट वाटत होते. पण काय करणार? इतक्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. झाडामागे कुणीतरी असल्याचा भास झाला. त्याने मागे पहिले तर त्याला दिव्य प्रकाश दिसला. त्याला आश्चर्य वाटले. त्या प्रकाशातून एक सुंदर परी प्रकट झाली. ती म्हणाली, “राहुल घाबरू नकोस. मी एक परी आहे. तू एवढा दु:खी का दिसत आहेस?” राहुलने तिला घडलेली हकीकत सांगितली. परी म्हणाली, ”मी तुझी इच्छा पूर्ण करीन. पण तुला एक परीक्षा द्यावी लागेल. त्यात तू पास झालास तर मी तुला मदत करीन.” राहुलने विचारले, “माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परीक्षा द्यायला तयार आहे. परी म्हणाली, “ठीक आहे. उद्या तू मला याच झाडाखाली भेट. असे म्हणून परी निघून गेली.

        दुसर्‍या दिवशी राहुल पुन्हा परीला भेटण्यासाठी निघाला. जाताना रस्त्यात त्याला लाल रंगाच्या मखमली कपड्यात बांधलेली एक वस्तू सापडली. त्याने ती उचलली व ही कोणाची वस्तू असेल म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. वस्तू खूप आकर्षक होती. त्याला रस्त्यात एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती काहीतरी शोधत असल्याचे त्याच्या लक्षात आले. राहुल लगेचच त्याच्याजवळ गेला व त्याने विचारले, “काका, आपण काही शोधत आहात का?” ते म्हणाले, ”हो, माझी एक वस्तू हरवली आहे.” राहुलने त्यांना त्याच्याजवळची वस्तू दाखवली नाही. त्याने विचारले, तुमची हरवलेली वस्तू काशी दिसते?” ते म्हणाले, ती वस्तू लाल मखमली कपड्यात बांधलेली आहे”. खात्री पटल्यावर राहुलाने ती वस्तू त्यांना दाखवली. त्यावर त्यांनी ती वस्तू त्यांचीच असल्याचे संगितले. राहुलने ती वस्तू त्यांना देऊ केली तर ते म्हणाले, “ही वस्तू तुला बक्षीस म्हणून ठेव.” राहुल गोधळला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून परीच होती. परी राहुलला म्हणाली, ”राहुल, तू परीक्षेत पास झाला आहेस. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. हे बक्षीस तू ठेव. तुझी इच्छा पूर्ण होईल.” राहुल खूप खुश झाला व परीचे आभार मानून घरी गेला. घरी गेल्यावर त्याने आईला सर्व हकीकत सांगितली. त्याने आईला बक्षीस दाखवले. त्याने ते उघडून पाहिले तर त्या कपड्यात पैसे होते. राहुलच्या आईलाही फार आनंद झाला. राहुल आपल्या आईबरोबर आनंदाने प्रदर्शन पाहायला गेला. राहुलने खूप पुस्तके विकत घेतली. राहुलची इच्छा पूर्ण झाली. मोठे झाल्यावर राहुलने तर वाचनालयच उघडले.

तात्पर्य : इच्छा प्रबळ असेल तर मार्ग नक्कीच मिळतो.

==========================================

                              Translation in English

A story on ‘Where there

 is a will there is a way’

       There was a village called Akur. In that village, a boy named Rahul lived with his mother. His mother worked in the fields. Rahul also sometimes helped his mother in her work. Rahul was studying in 7th standard. He was smart in his studies. Once he found out that the neighboring village was full of book exhibitions for three days. Rahul wanted to go to that exhibition. Some of his friends went to the exhibition. They told that there are many nice books on different topics in the exhibition. Also, books are kept for sale. Rahul was very happy to hear that. He asked his mother, "Shall we go to the exhibition?" The mother refused. She said, "There is no elder person to go with you, and you don't have enough money to buy the  books."


        Rahul became depressed. He walked and sat under a tree at a distance from the house. He was feeling bad. But what to do? Suddenly he heard a voice. There seemed to be someone behind the tree. When he looked back, he saw divine light. He was surprised. Out of that light, a beautiful fairy appeared. She said, "Rahul, don't be afraid. I am a fairy. Why do you look so sad? ” Rahul told her the fact. The fairy said, "I will fulfill your wish. But you have to give a test. If you pass, I will help you. ” Rahul replied, "I am ready to give the exam to fulfill my wish. The fairy said, “Okay. Tomorrow you will visit me under this tree and the fairy left.

        The next day, Rahul went to see the fairy again. On the way, he found an object wrapped in red velvet. He picked it up and looked around to see whose object it was. The objects were very attractive. He saw a man on the street and he noticed that the man was looking for something. Rahul immediately approached him and asked, "Uncle, are you looking for something?" He said, "Yes, I have lost one thing." Rahul did not show them anything near him. He asked, "What does your lost object look like?" "The object is wrapped in red velvet," he said. Rahul showed them the item with him. He said the item was his. When Rahul offered it to them, they said, "Keep it as a reward." Rahul was confused. That person was no other than a fairy itself. The fairy said to Rahul, "Rahul, you have passed the exam. I am very happy for you. You keep this reward. Your wish will come true. ” Rahul was very happy and went home thanking the fairy. When he returned home, he told his mother all the facts. He showed the mother the prize. He opened it and saw that there was money in it. Rahul's mother was also very happy. Rahul happily went to see the exhibition with his mother. Rahul bought a lot of books. Rahul's wish came true. When he grew up, Rahul opened a library.

Moral of the story :
 If the desire is strong, the path is definitely found.

Monday, June 29, 2020

Marathi Essay on Shalechya Ghanteche aatmavrutta


Marathi Essay on Shalechya Ghanteche aatmavrutta


                                                                       


शाळेच्या घंटेचे आत्मवृत्त


(Autobiography of the

School bell)


        आज परीक्षेचा शेवटचा पेपर होता. शाळेला सुट्टी लागणार होती, पेपर संपला व आम्ही सर्व मैत्रिणी व्हरांड्यात उभे होतो. तिथे आमच्या शाळेची मोठी घंटा आहे. आम्ही सर्वजणी बोलत होतो. कारण आम्ही सर्वजणी सुट्टी संपल्यावर नवीन वर्गात भेटणार होतो. एवढ्यात आम्हाला घंटेचा आवाज आला. आम्हाला वाटले वार्‍यामुळे घंटा हलली असावी म्हणून आम्ही घंटेकडे पहिले तर घंटा प्रत्यक्ष बोलू लागली.

        घंटा म्हणाली,” घाबरू नका. मीच आवाज केला. तुमचं बोलणं मी ऐकल. तुम्हाला सुट्टी पडली म्हणून तुम्ही खूप आनंदात आहात. पण तुम्ही मैत्रिणी सुट्टीमध्ये एकमेकांना भेटणार नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटते. पण तुम्ही विद्यार्थी ज्यावेळी घरी असता त्यावेळी मात्र मला खूप एकटेपणा जाणवतो. शाळेतील शिक्षकसुद्धा पेपर तपासून झाल्यावर सुट्टीवर जातात. मग मात्र मला खूपच एकट वाटत. या दरम्यान माझे काहीच काम नसत. मी मात्र तुम्हा सर्वांची आठवण काढत असते. मला हा एकटेपणा सहन होत नाही. कधी एकदा सुट्टी संपते व शाळा सुरू होते असे मला सतत वाटत राहते.

        मला माझ्या कामाबद्दल खूपच अभिमान आहे. तुम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात तर माझे महत्वाचे स्थान आहे. तुम्ही रोज शाळेत येता पण घंटा वाजायच्या आत तुम्ही शाळेत पोहोचता. त्यानंतर प्रार्थनेची वेळ सुरू होते तीही घंटा नादाने. एक तास संपला की पुन्हा माझा उपयोग होतो. एखादा कंटाळवाणा तास असला किंवा अभ्यास करायचा कंटाळा आला की तुम्ही सर्वजण कधी एकदा घंटा वाजते व हा कंटाळवाणा तास कधी संपतो याची वाट पाहत असता. अभ्यास करून कंटाळा येतो, भूक लागते तेव्हा तुम्हाला माझी खूपच आठवण येते. माझा आवाज आला की तुम्ही खुश होता. तुम्ही डबा खाता, मैदानावर खेळता, मस्ती करता परंतु जेव्हा तुम्हाला माझा आवाज येतो त्यावेळी मात्र तुम्हाला घंटा इतक्या लवकर का वाजली? असे वाटू लागते. पण मी माझे काम प्रामाणिकपणे व वेळेनुसार करते. त्यानंतर तुम्ही पुन्हा अभ्यास करता व शाळा कधी सुटते याची वाट बघता ज्यावेळी माझा आवाज येतो तेव्हा तुम्ही आनंदी होतो.

        अशा प्रकारे मी माझ कर्तव्य करत असते. पण मला तुमची इतकी सवय झाली आहे की सुट्टी पडली की मला फार वाईट वाटते. तुम्ही सर्वजण माझे सोबती आहात पण ठीक आहे. दरवर्षी प्रमाणे ही सुट्टी देखील मला एकटीलाच काढावी लागेल पण तुम्ही मात्र सुट्टीत खूप मजा करा. आनंदी रहा व लवकरात लवकर परत या.

        असे बोलून घंटा शांत झाली. कधी नव्हे ते आम्हाला शाळेच्या घंटेचे मनोगत आम्हाला समजले. घंटेबद्दल आमच्या मनात आदर निर्माण झाला. 
============================================================================

                                                  Translation in English 

              Autobiography of the School bell



            Today was the last paper of the exam. The school was about to break, the exams got over and we all friends stood in the veranda (passage). There is a big bell in our school. We were all talking. Because we were all going to meet in a new class when the holidays were over. Just then we heard some noise. We thought the wind must have moved the bell so we looked at the bell and the bell started speaking.

           The bell said, "Don't be afraid. I made a noise. I was listening to you. You're so happy to have a holiday. But you feel bad for not meeting each other during the vacation. But when you students are at home, I feel very lonely. School teachers also go on vacation after checking their papers. But then I feel very lonely. In the meantime, I had nothing to do. But I miss you all. I can't tolerate this loneliness. I always feel like when these holidays would over and school starts.
  
          I am very proud of my work. I have an important place in the lives of the students. You come to school every day before the bell ring. Then the prayer time starts with the ringing of the bell. After the 1st period, I was used again. Whether it's a boring hour or getting bored of studying, you all wait for the bell to ring once. When you are getting bored with studying or when you feel hungry you are eagerly waiting for me. when you heard my voice you feel very happy. You had your tiffin, play on the ground, have fun, but when you hear my voice you feel somewhat bad, why did the bell ring so early? It seems so. But I do my work honestly and on time. Then you study again and wait for school to leave. You are happy when my voice comes.

        That's how I do my duty. But I'm so used to you that I feel very bad about the holiday. You're all my friends, but that's fine. Like every year, I have to take this holiday alone but you have a lot of fun. Be happy and come back as soon as possible. ”

       The bell rang. At no time did we understand the psyche of the school bell. We developed a respect for the bell.

शाळेच्या घंटेचे आत्मवृत्त


(Autobiography of the 

School bell)

Monday, June 15, 2020

Marathi Essay on Mi pahileli jatra

marathi Essay on Mi pahileli jatra       marathi Essay on Mi pahileli jatra

मी  पाहिलेली जत्रा

“मी पाहिलेली जत्रा 
[A Fare I seen]

        जत्रा म्हटली की लहान मुलांचा आनंद. जत्रेत मिळणारी खेळणी, खाऊ, खेळ, इ. चे त्यांना फार आकर्षण असते. अशीच एक जत्रा मीही अनुभवली आहे.  

        मी एकदा माझ्या आईबरोबर माझ्या मावशीच्या गावी गेले होते. त्यांची ग्रामदेवता महालक्ष्मी आहे. या ग्रामदेवतेची दरवर्षी एप्रिल महिन्यातील पोर्णिमेला जत्रा असते. ती पाच दिवस असते. आम्ही त्याच दरम्यान मावशीकडे गेलो होतो. त्यामुळे आम्हाला जत्रेला जाण्याचा योग आला व ती जत्रा अनुभवायला मिळाली.

        आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो. सर्व कामे आटपून आम्ही न्याहारी केली व तयारी करून जत्रेला गेलो. माझ्या मावशीची मुलगी व मुलगा सोबत होते. त्यामुळे आम्हा मुलांचा जत्रेला जाण्याचा उत्साह खूपच वाढला होता. आम्ही जत्रेच्या ठिकाणी गेलो. गावातील सरपंच व तरुण मुलांनी जत्रेची अगदी चोख व्यवस्था केली होती. जत्रा व्यवस्थित कशी पार पडेल यासाठी खूप मेहनत घेतली होती. तसेच देवळात कुठेही गर्दी होऊ नये व सर्वांना दर्शन मिळावे याकडे विशेष लक्ष दिले होते.

        आम्हीसुद्धा देवीचे दर्शन घेतले. देवीचे देऊळ खूपच छान आहे. ते सुंदर फुलांनी सजवलेले होते. खूप छान रोषणाई केली होती. आत गाभारा सुगंधी फुलांनी सजवलेला होता. देवीलासुद्धा खूप सुंदर साडी व वेगवेगळ्या दागदागिन्यांनी सजवलेले होते. देवीचे रूप खूपच मनोहर दिसत होते. खूप दिव्यांची आरास केली होती. देवळाच्या बाहेरचा परिसरदेखील खूपच भव्य आहे. परिसरात खूपच जुन्या अशा दीपमाळा आहेत. त्यांना ही छान असे सजवलेले होते. संध्याकाळी या दीपमाळांच्या दिव्याची रोषणाई तेवढा परिसर उजळून टाकते. आम्ही देवीला नमस्कार करून बाहेर आलो व जत्रेत फिरायला गेलो. सर्व परिसर अगदी माणसांनी फुलून गेला होता. सर्व गाव व इतर गावातील लोकसुद्धा जत्रेला उपस्थित होते.


        जत्रेमध्ये खूप दुकाने सजलेली होती. गर्दी तर होतीच पण पुरेश्या अंतराने दुकानांची व्यवस्था केली होती. तसेच आकाशपाळणे, गोलचक्र व इतर खेळ होते. खाऊची दुकाने सुद्धा छान सजलेली होती. कपडे, चपला, भांडी, खेळणी यांची दुकाने होती. आम्ही काही नवीन कपडे, खेळणी खरेदी केली तसेच खूप खाऊ घेतला. आम्ही आकाश पाळण्यात बसलो व इतर खेळ ही खेळलो. तिथे कडक बुंडीचे लाडू व लाहया देवीचा प्रसाद म्हणून लोक आवर्जून विकत घेतात. घरगुती उपहारगृहे होती. तिथे आम्ही जेवलो. जत्रेत खूप फिरलो. भरपूर मजा केली. संध्याकाळ होत आली होती. दिव्यांच्या रोषणाईने सर्व परिसर झगमगून होता. आम्ही घरी जायला निघालो. पण जत्रेतून पाय निघत नव्हता.

        मला मावशीच्या गावी गेल्याचे सार्थक वाटले. कारण मला ही जत्रा अनपेक्षितपणे अनुभवायला मिळाली याच खूप आनंद झाला.   मी पाहिलेली जत्रा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली.

marathi Essay on Mi pahileli jatra


     
  मी  पाहिलेली जत्रा

 “मी पाहिलेली जत्रा’ 
[A Fare I seen]

==================================================================================


English Translation

             “Mi pahileli jatra 
         [A Fare I seen]
                                                                                    
        The fair is the joy of the little ones. Toys, food, games, etc. available at tGhe fair. They are very attractive. I have experienced a similar fair.

        I once went to my aunt's village with my mother. Her village deity is Mahalakshmi. This village deity has a fair on the full moon day of April every year. It lasts for five days. We went to my aunt in the meantime. So we decided to go to the fair and experience that fair.

        We woke up the next morning. After finishing all the work, we had breakfast and prepared and went to the fair. My cousin's daughter and son were with me. So we had a lot of enthusiasm to go to the children's fair. We went to the fairgrounds. The Sarpanch of the village and the youth of the village had arranged the fair very well. It took a lot of effort to figure out how to get the fair going. Also, special care was taken to ensure that there was no crowd in the temple and that everyone could get darshan(everyone could go into the sanctum and pray the goddess).

        We also visited the Goddess. The temple of the goddess is very nice. They were decorated with beautiful flowers. It was very nicely lit. Inside, the barn was decorated with fragrant flowers. The goddess was also adorned with the beautiful sari and various ornaments. The form of the goddess looked very beautiful. Lots of lights were arranged. The area outside the temple is also very grand. There are many old lighthouses in the area. They were nicely decorated. In the evening, the light of these lamps illuminates the area. We greeted the Goddess and came out and went for a walk in the fair. The whole area was crowded with people. All people from the village and other villages also attended the fair.

        There were many shops in the fair. It was crowded but the shops were arranged at a sufficient distance. There were also skydiving, roundabouts, and other games. The food stalls were also nicely decorated. There were shops selling clothes, slippers, utensils, and toys. We bought some new clothes, toys and ate a lot. We sat in the sky watching and played other games as well. There, The people buy of Bundi laddoos (sweet) and rice flakes (Lahya in the Marathi language) as a  Prasad of the goddess. There were domestic restaurants. We ate there. I went around the fair a lot. I had a lot of fun. It was getting late. The whole area was ablaze with lights. We left to go home. But the feet did not leave the fair.

        I felt it was worthwhile to go to my aunt's village. Because I was very happy to experience this fair unexpectedly. The ‘Fair I Saw’ was unforgettable for me.

   मी  पाहिलेली जत्रा

“मी पाहिलेली जत्रा 
[A Fare I seen]

Sunday, June 7, 2020

Marathi Essay on Television curse or boon

Marathi Essay on दूरदर्शन शाप की वरदान



दूरदर्शन शाप की वरदान

         विज्ञान व तंत्रज्ञानाने आपल्याला मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते म्हणजे दूरदर्शन अगदी लहान मुलांपासून ते
आबालवृद्धापर्यन्त सर्व जणांचे मनोरंजन होते.

        दूरदर्शनवर अनेक वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर आपल्याला            
 बातम्या, कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, कार्टून असे विविध कार्यक्रम दिसतात. आपल्या देशात प्रांतीय भाषा आहेत. त्या भाषेमध्ये सुद्धा या वाहिन्या असतात. तसेच जगातील घडामोडी पाहण्यासाठी वेगळ्या वाहिन्या असतात. आपल्याला सिनेमा, नाटक इ. वाहिन्या सुद्धा दिसतात. जगातील कुठलाही देश पाहता येतो व बसल्या जागेवर त्या देशात आपल्याला प्रवास करून आल्याचे सुख मिळते. आता तर गृहिणींना वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात याची पाककला शिकवतात. तसेच लहान मुलांना चित्रकला, हस्तकला इ. कसे करायचे ते ही शिकवतात. त्याचप्रमाणे काही ज्ञान वाढवणारे, काही प्रश्नोत्तराचे कार्यक्रम दाखवतात. आपल्याला आपल्या देशातील धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती घरबसल्या कळते. जगात कुठे काय चालले आहे. याची माहिती आपणा

 त्वरितमिळते.अशाप्रकारे दूरदर्शन हे आपल्यासाठी वरदानच आहे.

        पण कधीतरी काही लोक सतत दूरदर्शनचे कार्यक्रम पाहात असतात. त्यांना त्यांचे आवडीचे कार्यक्रम पाहताना कुणी जरा तरी हटकले तर त्याचा राग अनावर होतो. जर कधी क्रिकेटची मॅच सुरू असेल तर मात्र क्रिकेटप्रेमी दूरदर्शनला खिळूनच बसलेले असतात. तसेच काही लहान मुले सतत कार्टून्स पाहात असतात. त्यावेळी मात्र त्यांची सवय सुटत नाही. सतत दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहिल्यामुळे डोळे, डोके इ. वर परिणाम होतो. डोळे लाल होतात. अभ्यास लक्षात  राहात नाही. डोके गरगरते. सतत झोप येते. आळस निर्माण होतो. मुलांना अगदी लहानपणीच डोळ्यांना चश्मा लागतो. त्यांना मैदानी खेळ आवडेनासे होतात. जर घरात कुणी आल तर ते त्यांना आवडत नाही. त्यांना सतत दुरदर्शचे कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात. अशा मुलांचे खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. अशीच स्थिति काहीशी मोठ्यांची देखील असते. सतत टी. वी. पाहणार्‍या माणसांची सतत चिडचिड होते व कधी कधी अशी माणसे स्वत:हून इतर आजारांना आमंत्रण देतात.


        बहुतेक घरांमध्ये दूरदर्शन चा एकच संच असतो. पण लहान मुलांना त्यांचे कार्यक्रम सतत पाहण्याचे आकर्षण असते. पण कधी कधी मोठ्या माणसांना स्वत:चे कार्यक्रम पाहायचे असतात. पण लहान मुले त्यांना ते पाहायला देत नाहीत. त्यावेळी जी गंमत असते ती मात्र वेगळीच असते. लहान मुले अशावेळी सतत रिमोट कंट्रोल स्वत:कडेच घेऊन असतात. कधी कधी तर लपवून ठेवतात. असा हा दूरदर्शनचा परिणाम घराघरामध्ये दिसून येतो.

        मित्रांनोअसे जर होत असेल तर दूरदर्शनला शाप म्हणाल का? नाही. जर मोठ्या माणसांनी स्वत:ला योग्य सवय लावून घेतली तर तुमच्या मुलांनासुद्धा योग्य ती चांगली सवय लागेल. एक म्हणजे मुलांना कुठल्यातरी त्यांच्या आवडत्या विषयात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे व त्यात स्वत: पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. तसेच मुलांशी दूरदर्शनमुळे होणारे दुष्परिणाम यांविषयी संवाद साधा. अगदी प्रेमाने हा विषय समजावून सांगा. मग पहा दूरदर्शन सर्वांसाठी शाप नसून वरदानच ठरेल

           
     दूरदर्शन शाप की वरदान

Sunday, May 24, 2020

Marathi Essay on Autobiography of a parrot in cage

Marathi Essay on पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त





Marathi Essay on पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त

पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त

     मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिच्या घरी एक पोपट आहे. तो पिंजर्‍यात असतो. तो खूप सुंदर आहे. त्याच्याशी खेळायला मी कधी कधी तिच्याकडे जाते.आजही मी नेहमीप्रमाणे तिच्या घरी गेली व त्याला शिट्टी मारुन त्याच्याशी खेळायला सुरुवात केली पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही किंवा माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही. तो खूप रागातच दिसत होता. त्याने पेरु सुद्धा खाल्ला नव्हता. म्हणून मी त्याला विचारले,”तू आज एवढा रागात का दिसत आहेस? तू पेरु का नाही खाल्लास?” असे विचारताच तो बोलू लागला. तो म्हणाला,” तू मला भेटायला येतेस. माझ्याशी खेळतेस. तुला बरे वाटते. पण तू कधी माझा विचार केलास का? तुझ्या मैत्रिणीने मला या पिंजर्‍यात ठेवले आहे. घरातील सर्वांना मी आवडतो. सर्वजण माझी खूप काळजी घेतात. मला स्वच्छ ठेवतात. मला रोज पेरु, मिरची, चण्याची डाळ तसेच बिस्किट, चॉकलेटअसे आवडीचे पदार्थ खायला देतात. इतर पदार्थही मी आवडीने खाल्ले. मी सर्वांचा खूप आभारी आहे.

          पण मी मात्र या पिंजर्‍यातच बंदिस्त आहे. मला उडावेसे वाटते तरी या पिंजर्‍यातच उडतो. कधी कधी या पिंजर्‍यात माझे पंख अडकतात. समोरच्या झाडावर माझे खूप मित्र येतात. ते मला बोलावतात. पण मी कुठेही जाऊ शकत नाही. मलाही माझ्या मित्रांसोबत फिरावेसे वाटते. या आकाशात विहार करावा असे वाटते. सर्वांशी झाडावर बसून गप्पा माराव्याशा वाटतात. पण माझे हे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले आहे.

          तूच मला सांग जर तुम्हाला पाय असून कुणी तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवले तर? तुमच्या स्वातंत्र्यावर कोणी निर्बंध लादले गेले तर विचार कर कसे वाटेल? मलाही माणसांचा खूप त्रास होतो व राग येतो तर कधी कधी स्वत:चाच. मी तुला एक विनंती करतो की तू तुझ्या मैत्रिणीला समजावून सांग व मला या पिंजर्‍यातून मुक्त कर. मी झाडावर बसेन, माझ्या मित्रांबरोबर दिवसभर फिरून येईन, खूप मजा करेन, पण मी रोज संध्याकाळी आल्यावर तुम्हाला भेटायला येईन, तुमच्याशी खेळेन. तुम्ही दिलेला खाऊ खाईन. माझ्या इतर मित्रांनासुद्धा घेऊन येईन. तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. पण मी तुला जे संगितले आहे ते लक्षात ठेव.” इतके बोलून तो गप्प बसला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. त्याचे ते बोलणे ऐकुन मी ही नि:शब्द झाले. मला खूप वाईट वाटले. पण या पोपटाला स्वतंत्र करण्याचा मी मनाशी निर्धार केला व तिथून निघाले. 

Thursday, May 21, 2020

Marathi Essay on Manvi Jivnat Vinodache Mahattva





मानवी जीवनात विनोदाचे महत्व

        आपण सर्वजण नेहमी आपल्या घरातल्यांशी, शेजार्‍यांशी, मित्रांशी काही न काही तरी बोलत असतो. पण त्यातला एखादा कुणीतरी सहजतेने एखाद वाक्य बोलून जातो की खूप हसायला येते. कधी कधी तर हसू अनावर होते. यालाच आपण विनोद असे म्हणतो व विनोद करणार्‍याला विनोदी माणूस म्हणून संबोधले जाते.   
        पुढे पुढे या विनोदाच्या कलेच व्यवसायात रूपांतर झाले. विनोदाची भाषा शिकायला कुठलच प्रशिक्षण घ्यावं लागत नाही तर ती कला ठराविक माणसांमध्ये   उपजतच असते. यानंतर विनोदी पुस्तके लिहिली गेली. चित्रपट, नाटकांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व असलेले प्रसिद्ध मराठी विनोदी लेखक म्हणजे पु. . देशपांडे.  हे नाटककार, कलावंत तर होतेच पण त्याच्यात तरल कल्पनाशक्ती व भाषेचे कल्पक उपयोग करण्याचे कौशल्य होते. स्वत: गंभीर राहून इतरांना हसवत ठेवणे यात त्यांचा हातखंड होता. टिव्हीवर सुद्धा विनोदाचे खूप कार्यक्रम येतात. त्यातला झी मराठी वरचा चला हवा येऊ द्या  हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम आहे. यातले विनोदवीर नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे इ. विनोदवीरांनी केलेल्या विनोदी अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांना खूप आनंद मिळतो. थोडावेळ का होईना ते आपली सुखदु:ख विसरून मनापासून खळखळून हसतात.
         अशा या विनोदाचे मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. काही काही माणसांना जीवनात नैराश्य आलेल असत. काही माणसे दुर्धर आजाराने त्रस्त असतात तर काही परिस्थितीने गांजलेले असतात. त्यांना हे जीवन नकोस वाटत असत. तर काही रोजच्या कामामुळे त्रस्त असतात. ते सतत चिडचिड करत असतात. पण अशातच विनोदाची साथ असेल तर मनावरचा ताण कमी होतो. विनोदी कार्यक्रम, सिनेमा किंवा नाटक पाहिल्यावर ज्यावेळी माणसे मनापासून खळखळून हसतात. त्यावेळी मात्र त्यांच्या मनावरचा थकवा कमी झालेला असतो. आजारी माणसामध्ये किमान ५०% लोक केवळ विनोद ऐकल्यामुळे बरे होतात. हळूहळू त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण होते. अशा प्रकारे विनोदाला मानवी जीवनात खूप महत्वपूर्ण स्थान आहे. कारण मन प्रसन्न असेल तर सर्व आयुष्य सुखकर होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,”    
        मन करा रे प्रसन्न|     
              सर्व सिद्धीचे कारण|