expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on Manvi Jivnat Vinodache Mahattva

Thursday, May 21, 2020

Marathi Essay on Manvi Jivnat Vinodache Mahattva





मानवी जीवनात विनोदाचे महत्व

        आपण सर्वजण नेहमी आपल्या घरातल्यांशी, शेजार्‍यांशी, मित्रांशी काही न काही तरी बोलत असतो. पण त्यातला एखादा कुणीतरी सहजतेने एखाद वाक्य बोलून जातो की खूप हसायला येते. कधी कधी तर हसू अनावर होते. यालाच आपण विनोद असे म्हणतो व विनोद करणार्‍याला विनोदी माणूस म्हणून संबोधले जाते.   
        पुढे पुढे या विनोदाच्या कलेच व्यवसायात रूपांतर झाले. विनोदाची भाषा शिकायला कुठलच प्रशिक्षण घ्यावं लागत नाही तर ती कला ठराविक माणसांमध्ये   उपजतच असते. यानंतर विनोदी पुस्तके लिहिली गेली. चित्रपट, नाटकांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व असलेले प्रसिद्ध मराठी विनोदी लेखक म्हणजे पु. . देशपांडे.  हे नाटककार, कलावंत तर होतेच पण त्याच्यात तरल कल्पनाशक्ती व भाषेचे कल्पक उपयोग करण्याचे कौशल्य होते. स्वत: गंभीर राहून इतरांना हसवत ठेवणे यात त्यांचा हातखंड होता. टिव्हीवर सुद्धा विनोदाचे खूप कार्यक्रम येतात. त्यातला झी मराठी वरचा चला हवा येऊ द्या  हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम आहे. यातले विनोदवीर नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे इ. विनोदवीरांनी केलेल्या विनोदी अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांना खूप आनंद मिळतो. थोडावेळ का होईना ते आपली सुखदु:ख विसरून मनापासून खळखळून हसतात.
         अशा या विनोदाचे मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. काही काही माणसांना जीवनात नैराश्य आलेल असत. काही माणसे दुर्धर आजाराने त्रस्त असतात तर काही परिस्थितीने गांजलेले असतात. त्यांना हे जीवन नकोस वाटत असत. तर काही रोजच्या कामामुळे त्रस्त असतात. ते सतत चिडचिड करत असतात. पण अशातच विनोदाची साथ असेल तर मनावरचा ताण कमी होतो. विनोदी कार्यक्रम, सिनेमा किंवा नाटक पाहिल्यावर ज्यावेळी माणसे मनापासून खळखळून हसतात. त्यावेळी मात्र त्यांच्या मनावरचा थकवा कमी झालेला असतो. आजारी माणसामध्ये किमान ५०% लोक केवळ विनोद ऐकल्यामुळे बरे होतात. हळूहळू त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण होते. अशा प्रकारे विनोदाला मानवी जीवनात खूप महत्वपूर्ण स्थान आहे. कारण मन प्रसन्न असेल तर सर्व आयुष्य सुखकर होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,”    
        मन करा रे प्रसन्न|     
              सर्व सिद्धीचे कारण|            

No comments: