expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on jagtik paryavaran divas

Tuesday, May 19, 2020

Marathi Essay on jagtik paryavaran divas


Marathi Essay on jagtik paryavaran divas  .
Marathi Essay on jagtik paryavaran divas








                  जागतिक पर्यावरण दिवस


            पर्यावरणाचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात ठिकठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प केला जातो. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांनासुद्धा पर्यावरणाचे महत्व कळावे म्हणून शाळाशाळांमध्ये पर्यावरणाशी संबधित विविध कार्यक्रम राबवले जातात. 

            आपण ज्या शहरात राहतो तिथे आपल्या आजूबाजूला असलेला परिसर म्हणजेच पर्यावरण. या परिसरात असलेले सर्व सजीव, निर्जीव घटक, हवा, पाणी इ. सर्व मिळून पर्यावरण तयार होते. पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणजे वनसृष्टी. कारण वृक्ष प्रकाशसंश्लेषणाची क्रिया करून स्वत:चे अन्न तयार करतात व प्राणवायू देतात. इतर जीवसृष्टी ही अन्नासाठी वनस्पतिवरच अवलंबून असतात. या निसर्गात मिळणारी सर्व झाडे, वेली, झुडपं हे सर्व खूप उपयुक्त असतात. झाडांमुळे माणसाच्या सर्व मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा इ. पूर्ण होतात. झाडे व सर्व प्राणी हे पर्यावणाचे पूरक घटक आहेत. झाडाच्या प्रत्येक अवयवांचा माणसाला उपयोग होतो. तसेच पृथ्वीवर मिळणारी नैसर्गिक संपत्ती म्हणजे इंधने, धातू इ. हे सुद्धा माणसाच्या गरजा भागवतात. पण मानवाने या सगळ्याचा सर्रास वापर करायला सुरुवात केली. लोकसंख्या वाढली. त्यामुळे माणसाच्या गरजा वाढू लागल्या. त्यासाठी त्याने जंगले तोडली. तेथील जमिनीवर कारखाने, इमारती उभारल्या. दळणवळणासाठी रस्ते बांधले. शेतीसाठी जमिनी तयार केल्या. कारखान्यातील रसायनामुळे नदी, नाले व पाणी प्रदूषित झाले. त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टीची हानी होते. जंगल तोडीमुळे झाडांवर राहणारे पक्षी हे बेघर झालेत. तसेच वन्य पशूना सुद्धा इतर ठिकाणी जावे लागले.कारखान्यातील धूर, वाहनामधल्या इंधनाचा धूर यामुळे हवेचे प्रदूषण वाढले. तसेच कारखान्यातील मोठमोठ्या मशीनींचा आवाज, वाहनांचा आवाज, फटाके, विमाने इ. च्या आवाजाने ध्वनीप्रदूषण वाढले आहे. इतकेच नाही तर अवकाशात उपग्रह सोडण्यात येतात. विज्ञानाने केलेली प्रगती खरच चांगली आहे. शेतीचे उत्पादन कमी वेळेत जास्तीत जास्त घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आले. रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात झाली   कळत नकळत या सर्वांचा पर्यावरणावर परिणाम होत गेला. अशा या मानवी कृत्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पृथ्वीवर उष्णतेचे प्रमाण वाढले. पावसाचे प्रमाण अनियमित झाले. इतकेच काय तर मानवाचे स्वत:चे आयुष्यमान  देखील कमी झाले.  याच साठी सरकारने वन्य पशू पक्षी यांच्या संवर्धंनासाठी राखीव जंगले  ठेवली. जर तुम्हाला पर्यावरण चांगले ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लावले पाहिजेत. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने यावर निर्बंध घालून पशू पक्षी यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. जर आपल्या भावी पिढीला व्यवस्थित ठेवायचे असेल तर पर्यावरणाची काळजी घेण फार गरजेचे आहे.         
            अशारीतीने पर्यावरण ही आपली नैतिक जबाबदारी आहे व त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असा प्रत्येकाने संकल्प  केला तर खर्‍या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश सफल होईल.  


                                           जागतिक पर्यावरण दिवस

No comments: