expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on shetakaryache manogat

Sunday, May 17, 2020

Marathi Essay on shetakaryache manogat


  Marathi Essay on 
 Autobiographyof  
         Farmar



                             
         शेतकर्‍याचे मनोगत

            जय जवान, जय किसान हे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचे घोषवाक्य. सीमेवर रक्षण करणारे जवान व अन्नदाता शेतकरी दोन्ही सारखेच अशा या या बळीराजाची व्यथा जाणून घेण्याची मला संधी मिळाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात आईवडिलांसोबत काही कामानिमित्त गावी गेले होते. त्यावेळी आमच्याच गावातील शेतकरी रामभाऊ यांच्याशी बोलता आले. त्यांची स्वत:ची फक्त २ एकर जमीन आहे. ते आमच्या जमिनीत शेती करतात व आम्हाला त्यातला वाटा देतात. शेत आमच्या घराजवळ आहे.
            एकदा दुपारी रामभाऊ काका शेतात एका झाडाखाली आकाशात पाहत असलेले मला दिसले. मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले असता ते म्हणाले ,”मी आकाशात ढग दिसतात का ते पहात होतो. मागच्या आठवड्यात सुरूवातीला मोठा पाऊस आला होता. त्यामुळे सर्वांनी नांगरणी करून पेरणीसुद्धा केली. अस वाटत होत की पाऊस आता असाच येत राहील. पण मी ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवसापासून आज चार दिवस झाले पाऊस आलाच नाही. पेरणी केल्यानंतर जर पाऊस आला तर धान्य चांगल रुजत. पण आज चार दिवस होऊन गेले पण पाऊस मात्र आलेला नाही. पण लख्ख ऊन मात्र आला आहे. त्यामुळे पेरलेले धान्य वरच राहते व पक्षी धान्य टिपायला येतात त्यामुळे शेतात दिवसभर बसून राहावे लागते.”
            ते पुढे म्हणाले,शेतकर्‍याचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस वेळेवर आला तर शेतात चांगले व सकस पीक येते. पण जर पाऊस नसेल तर मात्र आमच जगणच कठीण होते. आताच बघ ना, पेरणी तर झाली पण पाऊस झाला नाही. आता हे बियाण नंतर व्यवस्थित रुजणार नाही व अपेक्षित तेवढे धान्य मिळणार नाही. मग पुन्हा उसणवारी करावी लागते व कुणाकडे तरी मोलमजुरी करून पैसे परत करावे लागतात. सरकारकडून कधी कधी मदत मिळते पण ती अपुरी पडते. शेतीला लागणारा खर्चसुद्धा कधी कधी भरून निघत नाही. ज्यांची मोठी जमीन आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. ज्यांच्याकडे आधीचे ही धान्य असते त्यांना काही काळजी वाटत नाही. पण माझ्यासारख्या लहान शेतकर्‍याला मात्र खूप त्रास होतो. आमच कुटुंब हे शेतीवरच अवलंबून असत. इतर उदरनिर्वाहाच काहीच वेगळं साधन नाही. शेतीची कापणी झाल्यावर यात मी भाजीपाला करतो व ते तालुक्याला आठवडी बाजारात नेऊन विकतो. पण त्यातही जास्त फायदा मिळत नाही. जर पाऊस एक दोन दिवसात नियमित सुरू झाला तर मात्र हे वर्ष चांगल जाईल नाही तर पुन्हा ओढाताण होईल. अस बोलता बोलता त्यांचे डोळे पाण्याने भरून आले.”
            
            मलाही त्याची ही व्यथा ऐकून खूपच वाईट वाटले. 
     
                             शेतकर्‍याचे मनोगत

No comments: